मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट लिहीत आहे कारण ती खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला गोष्टी सांगायला पण खूप आवडतात आणि मला तशाही गप्पा मारायला खूप आवडतात ज्यांच्याशी माझा जमतं त्यांच्याशी
रुक्मिणी ही कृष्णाची पहिली पत्नी म्हणून त्यांच्या महालामध्ये असताना पुढच्या लग्नाविषयीच्या गोष्टी घडल्या रुक्मिणीच्या आणि कृष्णाच्या विवाहाची स्टोरी मी नवीन एका पोस्टमध्ये वेगळी लिहील
सीमांतक मणी
तर जेव्हा कृष्णाचा आनंदी संसार चालू होता आणि कृष्ण एक प्रिय राजा म्हणून राज्य करत होता त्यावेळेस द्वारिकेच्या प्रजेमध्ये एका विशिष्ट गोष्टीविषयी चर्चा चालू होती ही गोष्ट म्हणजे एक अतिशय अनमोल रत्न ज्याला सीमांतक मणी असे म्हणले जात.
एका प्रजाजनाच्या शेतामध्ये हा एक जादुई मणी त्याला सापडला होता जो रोज त्याला अनेक आणि अनेक पटींमध्ये सोने देत असे आणि असा अतिशय अनमोल आणि दुर्मिळ म्हणी त्यांनी कृष्णाला द्यावा कारण कृष्ण हा त्या राज्याचा राजा आहे आणि सर्व संपत्ती त्याच्या अधिकारक्षेत्राखाली येते अशी चर्चा काही प्रजाजनांमध्ये चालू होती आणि अचानक हा जादूचा मणी चोरीला गेला आणि अर्थातच कृष्णाच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली आणि त्याने या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यातील ठरविले आणि मी स्वतः या मण्याचा शोध घेईन असे त्याने आश्वासन दिले.
शोध घेता घेता निबीड अरण्यामध्ये कृष्ण एका विशिष्ट गुहे पाशी पोहोचला जेथून त्याला अत्यंत दिव्य प्रकाश आणि खूपच तेजस्वी आणि प्रखर प्रकाश त्या गुहेच्या द्वारातून बाहेर घेताना दिसला त्यामुळे कृष्ण ते लक्ष त्याकडे विशेष करून वेदले गेले आणि हा जादुई मणी नक्कीच या गुहेच्या आत मध्ये असेल अशी त्याची खात्री पटली त्याने या गुहेमध्ये जाऊन शोध घेण्याचे ठरविले
आत गेल्यानंतर अत्यंत दिव्य प्रकाश ज्या जादूच्या मण्यामधून येत होता तो जादूचा मणी देखील त्याला दिसला आणि तो मणी हातात घेतलेली एक अतिशय सुंदर तरुणी त्याला दिसली आणि अर्थातच प्रेमाची मूर्ती असलेल्या कृष्णाला पाहून ही तरुणी तक्षणी श्रीकृष्णांच्या प्रेमात पडली. आणि जादूच्या मण्याची मागणी करताना कृष्णाला देखील हे प्रेम जाणविले मात्र ह्या तरुणीने तरी देखील जादूचा मणी देण्यास नकार दिला आणि हा जादूचा मणी हवा असेल तर माझ्या बाबांची युद्ध करा असे तिने कृष्णाला सांगितले.
आणि लगेचच जांबुवंत कृष्णाशी युद्ध करायला तेथे उपस्थित झाले आणि नाव जर तुम्हाला परिचित असेल तर हे तेच जांबुवंत होते जे कृष्णाच्या आधीच्या जन्मात म्हणजेच श्री राम जन्मामध्ये त्रितायुगात श्रीरामाच्या बाजूने रावणाशी युद्ध करण्यास अत्यंत मोलाचे कार्यकर्ते ठरले होते. महापराक्रमी अस्वलाचे शरीर असणाऱ्या या जांबुवंताला जेव्हा श्रीकृष्णांनी हरविले तेव्हा त्यांना गतजन्मीच्या श्रीकृष्णांनी दिलेले म्हणजेच श्रीरामांनी दिलेले वचन पाठविले आणि त्यांच्या मनाची दिव्य खूण पटली आणि त्यांनी त्यांच्या श्रीरामांना ओळखले. श्रीकृष्णाने देखील हसूनच या सर्व गोष्टीची संमती दर्शविली. गेल्या जन्मीचे एक पत्नीनिष्ठ श्रीराम यांनी या जन्मी शक्य नाही परंतु पुढच्या जन्मी मी तुझ्याशी नक्कीच विवाह करेन असे वचन जांबुवंतांना दिले होते आणि प्रेमाने आधीच एकमेकांचे झालेल्या जांबुवंती आणि श्रीकृष्णांचे अशाप्रकारे जांबुवंतांनी लग्न लावून दिले आणि श्रीकृष्णाला त्यांची दुसरी राणी मिळाली.
अर्थातच श्रीकृष्णांनी हा मणी जांबवंतीकडून घेऊन त्यांच्या प्रजाजनाला परत केला तेव्हा त्यांनी अतिशय प्रसन्न होऊन आपली मुलगी म्हणजेच सत्यभामा हिला आणि ह्या अतिशय जादुई सीमांतक मण्याला देखील श्रीकृष्णांना समर्पण करण्याचे इपसीत बोलून दाखविले. पुन्हा एकदा श्रीकृष्णांच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडलेल्या या अतिशय सुंदर यादव कन्येला श्रीकृष्णांनी आपली पत्नी म्हणून हसतच स्वीकारले आणि अशाप्रकारे श्रीकृष्णांना आपली तिसरी राणी मिळाली.
नरकासुराचा वध आणि पारिजातकाचा वृक्ष
अशाप्रकारे आपल्या तीन राहण्यांबरोबर सुखाने राज्य करत असताना देवलोकेंकडून श्रीकृष्णांना अतिशय आजीची विनंती करण्यात आली की त्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करावा कारण ब्रह्मदेवांच्या वरदान प्रमाणे कोणताही देव त्यांना मारू शकत नव्हता म्हणूनच मनुष्य रुपातील श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून पृथ्वीला आणि देवांना त्यांच्या त्रासातून मुक्त करावे असा प्रस्ताव सर्व देवांकडून श्रीकृष्णांकडे ठेवण्यात आला.
या प्रस्तावाला मान्यता देऊन धर्माच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण जेव्हा नरकासुराचा वध करण्यासाठी आपल्या गरुडावरून निघाले तेव्हा यादव कन्या सत्यभामा देखील कृष्णांबरोबर या युद्धामध्ये सामील झाल्या आणि त्यांनी देखील अतिशय मोलाची मदत केली ज्यामुळे नरकासुराचा वध शक्य झाला.
त्या सत्यभामा राणीचे हे साहस आणि पती निष्ठा बघून देवमाता आदिती या अतिशय प्रसन्न झाल्या आणि त्यांनी राणी सत्यभामेला चिरतारुण्य-वरदान दिले. स्वर्गातून विजयी होऊन द्वारकेस परतताना श्रीकृष्णांनी स्वर्गातील नंदनवन मध्ये असलेल्या पारिजातक वृक्षाचे एक फुल आपल्या लाडक्या रुक्मिणी राणीसाठी भेट म्हणून आणले आणि या फुलामुळेच देवलोकी मध्ये कोणीही कधीच वृद्ध होत नाही आणि नेहमीच चिरतरुण राहतात त्यामुळे ही अनमोल भेट आपल्या लाडक्या रुक्मिणी राणीसाठी देखील चिरतारुण्याचा एक अफलातून खजिना आहे हे श्रीकृष्ण जाणत होते आणि ही बातमी समजल्यानंतर सत्यभामा राणी दुःखी झाल्या आणि श्रीकृष्णांनी फक्त आपल्यावरच सर्वाधिक प्रेम केले पाहिजे या त्यांच्या भावनीला यामुळे फार मोठा धक्का बसला.
या सर्व प्रकारामुळे राणी सत्यभामा श्रीकृष्णांवर आणि त्यांनी अख्खा पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीवर आणण्याची श्रीकृष्णांकडे मागणी केली. देवराज इंद्र यांनी अर्थातच तो देण्यास नकार दिला आणि इंद्राचे गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णांनी मात्र त्यांच्याशी युद्धात जिंकून महादेवांच्या सहाय्याने पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीवर आणला आणि ह्या वृक्षाच्या सानिध्यामध्ये अत्यंत भाग्यकारी समजले जाणारे पुण्यक व्रत करण्याचा राणी सत्यभामा यांनी निर्धार केला.
सत्यभामेचे गर्वहरण
अत्यंत अहंकारी झालेल्या सत्यभामेला श्रीकृष्णांनी आपल्या हट्ट हा तर आजपर्यंत कधीही न घडलेली घटना घडवून आणली आणि देवलोकीचा वृक्ष आपल्या दारी आणला यामुळे राणी सत्यभामा ह्यांना अतिशय गर्व झाला होता.
आता भाग्यकारी पुण्यक व्रत केल्यामुळे संपूर्ण जन्म पतीचा सहवास त्यांना मिळणार होता आणि सर्व प्रकारच्या सुखाची या व्रतामुळे प्राप्ती त्यांना होणार होती त्यामुळे त्या अतिशय सुखावलेल्या होत्या.
श्रीकृष्णांनी नारदाला या गर्वहरणाचा बेत सांगितला आणि व्रताच्या ठिकाणी पुरोहित म्हणून उपस्थित राहण्यासाठी सांगितले. आपल्या स्वामींच्या ह्या खट्याळ बेतामध्ये अर्थातच नारद मुनी हसत हसत सहभागी झाले आणि त्यांनी सर्व व्रत राणी सत्यभामेला सांगितले आणि पुरोहित म्हणून संपूर्ण व्रताचा कार्यक्रम पार पाडला. अखेरी काहीतरी दान म्हणून द्यावे अशी राणी सत्यभामेला मागणी केली आणि त्यांना विचारले की तुमची सर्वात प्रिय गोष्ट काय आहे यावर राणी सत्यभामा सत्वर म्हणल्या की माझी सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे माझे पती श्रीकृष्ण आहेत. यावर नारद चतुराईने म्हणाले म्हणूनच तुमची सर्वात प्रिय गोष्ट तुम्हाला मला दान म्हणून द्यावी लागेल आणि श्रीकृष्णांचे दान तुम्हाला मला करावे लागेल या गोष्टीमुळे श्रीकृष्णाच्या तीनही राण्या चक्रावून गेल्या.
व्रत संपूर्ण झाल्यामुळे पुरोहितांना इच्छित दान द्यावेच लागणार होते आणि नाईलाजाने राणी सत्यभामेने आपली पती साक्षात श्रीकृष्णांचे दान, नारायणांचे दान नारदाला केले आणि सर्व जगाचे त्रिलोकीचे स्वामी नारद मुनींचे दास होऊन राहिले..!!!
कुठेही शोधाशोध केली श्रीकृष्ण महालात सापडेनात आणि जेव्हा सापडले तेव्हा नारद मुलींच्या आज्ञेवरून ते स्वयंपाक घरामध्ये कोथिंबीर मिरचीची वाटून चटणी करत होते ...!!
हे पाहून मात्र श्रीकृष्णाच्या तीनही राण्यांना रडू फोटो फुटले आणि राणी सत्यभामेने आपले पती श्रीकृष्णांना या दास्यत्वातून मुक्त करण्याची नारद मुनींना विनंती केली.
यावर नाराज चतुराईने म्हणले सोपी गोष्ट आहे आपण श्रीकृष्णांच्या ऐवजी अशीच एखादी अमूल्य गोष्ट मला द्यावी आणि श्रीकृष्णांना या दास्यत्वातून सोडवून घ्यावे यावर राणी सत्यभामा अतिशय खुश झाल्या कारण त्यांना माहीत होते की त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. त्यांनी तक्षणी या विचारास संमती दिली आणि एका पारड्यामध्ये श्रीकृष्णांना बसवून त्यांच्याच इतके मोलाचे अनमोल रत्न सुवर्ण अलंकार सोने नाणे अशा अनेक मौल्यवान गोष्टींचे दान त्या नारद मुनींना करायला निघाल्या..!!!
सर्व त्रिलोकीचे स्वामी असणाऱ्या आणि साक्षात प्रेमाचे स्वरूप असणाऱ्या श्रीकृष्णांचे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे कसे मोल ठरवले जाईल इतकी साधी गोष्ट अहंकाराने भरलेल्या सत्यभामा राणीच्या मनाला स्पर्शही करून गेली नाही...!
मी त्यानंतर अतिशय चमत्कारी घटना घडल्या महालातील सर्व धनधान्य नायब रत्न आणि सर्व संपत्ती श्रीकृष्णांच्या शेजारील पारड्यामध्ये घातली तरी देखील श्रीकृष्णांचे पारडे जडच राहत होते आणि अखेरीस राणी सत्यभामा रडकुंडीला आल्या आणि हे पाहून श्रीकृष्णाने हळूच आपल्या लाडक्या रुक्मिणी राणी खुणेने काही समजावले.
श्रीकृष्णांचा हा प्रेमळ संदेश हसतच रुक्मिणींना समजून गेला आणि त्यांनी हळूच सत्यभामेच्या कानी सांगितले की श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असलेल्या अतिशय पवित्र अशा तुळशीचे एक देठ श्रीकृष्णांच्या शेजारील पारड्यामध्ये घालावे. त्या क्षणी फार मोठा चमत्कार झाला आणि श्रीकृष्णांची पारडे त्या पारड्याच्या समसमान उभे राहिले आणि हे पाहून राणी सत्यभामा चक्रावून गेल्या.
सर्व महालांमधील अचाट संपत्ती इतकेच नव्हे त्यांच्या अंगावरील सर्व स्त्रीधन देखील त्यांनी श्रीकृष्णांच्या शेजारील पारड्यामध्ये घातले परंतु पारडे अजिबात हल्ले नाही आणि या एका तुळशीच्या देठामुळे पारडे समसमान कसे झाले.
आणि आपले काहीतरी चुकते आहे अशी काहीतरी जाणीव त्यांना होऊन गेली आणि त्या क्षणी राणी रुक्मिणी या गोष्टीचा खुलासा केला.
विश्वाचे स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णांची तुला या काही रत्न माणिक सोन्या नाण्याने कशी होईल...! आणि प्रेम ही तर सर्वात मोठी शक्ती आहे ज्या शक्तीमुळे परमेश्वर देखील आपले होतात आणि ते प्रेम ह्या तुळशीच्या देठामुळे परमेश्वरांना मिळाले आणि मग ही तुला संपन्न झाली.
प्रेमाची तुलना प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाने कशी होईल...? प्रेमाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे कसे मापले जाईल..!!
या सर्व प्रकारामुळे आणि गोष्टी लक्षात आल्यामुळे राणी सत्यभामीचा अहंकार निखळून पडला त्यांचे सौंदर्य त्यांची युद्धनीती आणि कौशल्य तसेच चिरतारुण्याचा देवमाता आदिती यांचा आशीर्वाद या सर्व गोष्टी असून देखील खरे प्रेम त्यांना समजले नव्हते जे श्रीकृष्णांनी आपल्या या लिहिले मधून त्यांना दाखवून दिले आणि गर्व,मागणी या गोष्टीचे खऱ्या प्रेमामध्ये काहीही स्थान नाही हा एक अतिशय मोलाचा संदेश सर्व संसारासाठी श्रीकृष्णांनी तेथे दिला.
खरे प्रेम हे निखळ प्रेम असते जिथे फक्त आणि फक्त देणे असते प्रेमामध्ये सर्वस्व समर्पण महत्त्वाचे असते प्रेमामध्ये कोणताच अहंकार कोणतीच अपेक्षा कोणतीच मागणी कोणताही व्यवहार कधीच असू शकत नाही. कृष्णांनी अशाप्रकारे पुन्हा एकदा प्रेम म्हणजे काय हे साऱ्या जगताला दाखवून दिले या प्रेमाशिवाय आज कलियुगामध्ये देखील अनेक लोकांची आयुष्य ही अपुरी आहेत आणि हे कळण्यासाठी श्रीकृष्णांचा धावा करणे हा फार सोपा मार्ग आहे.
खरे प्रेम शाश्वत असते जन्म मृत्यूच्या बंधनांच्या पलीकडे असते प्रेम विश्वाच्या कणाकणामध्ये आहे ते स्त्री-पुरुषांमध्ये आहे ते माता आणि पुत्रामध्ये आहे.
ते आपल्या आजूबाजूच्या सर्व पशुपक्षांमध्ये आहे निरभ्र आकाशामध्ये आणि रात्रीच्या चमचमणाऱ्या तारकांमध्ये आहे या सूर्यामध्ये या चंद्रामध्ये आहे या संपूर्ण विश्वामध्ये फक्त आणि फक्त प्रेम आहे. प्रेमाची ही व्याख्या ज्याला कळली समजली त्याचे आयुष्य प्रेमाचे होते आणि परमेश्वराच्या हृदयामध्ये त्यांना कायमस्वरूपी प्रेमाचे स्थान मिळते.