loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, May 27, 2011

लहानपण देगा देवा ...........

हे जीवन सुंदर आहे ....... ! हे स्मिता तळवलकरच किती सुंदर गाणे ! कधीतरी याच नाण्याची दुसरी बाजूपण दिसते. माणूस मोठा होतो ; घरापासून शाळेपासून ऑफिसातल्या कामात गुंततो. आजुबाजूच वातावरण बदलत , आजूबाजूचे लोक बदलतात. मित्र -मित्र म्हणणारा कधी पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याच  गुपित आई ला सांगतो, कधी ऑफिसात चुगल्या करतो. कटकटी असतात ; सगळीकडेच. पण वयाबरोबर , आपल्या यशाबरोबर हि कटकटीनची तीव्रता वाढत जाते. 
     गम्मत आहे ! आपले आई बाबा , आप्तजन, आपल्या शाळेतल्या बी सारे जण असताना आपल्याला जपले जाते हळुवार तळहाताच्या फोडासारखे. आणि नाण्याच्या दुसर्या बाजूची सुरुवात होते ; so called " मोठ झाल्यावर " .. ! 
     तस म्हणलं तर प्रत्येकाला एकमेकांची गरज असते. कोणीतरी कोणालातरी त्रास देत असत. कोणीतरी कोणाचा तरी खांदा शोधत असतं. मग त्रास देणारेच खांदा देणारे का नाही होऊ शकत ? त्रास देणार्यांना असा वागण्यास कोण प्रवृत्त करते? यशाची अतिरिक्त हाव , सौज्ञा हरविलेले यश शोधण्याची व्यर्थ धडपड , चुरस , इगो,  पायखेची मनोवृत्ती, दडपण , एकाकी पण , व्यसनाधीनता , सारासार विचार करण्याची क्षमता हरविणे, गैर मार्गाने विचार करणे.... आणि बस ! चक्र सुरु ! 
      केवळ मनातून स्वच्ह राहिल्याने जगातील कित्येक हृद्य विकार टाळतील, माणूस  मन्सासची माणसासारखा वागल्याने तणाव, दडपण आणि कित्येक मनोविकार टाळतील. काम करणे आनंदमय होईल , एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद द्विगुण करता येईल. 
     तम वृत्तीच्या , वाम मार्गाला लागून आपण स्वतः आपल्या आयुष्याचे नुकसान करीत आहोत. कोणी वाचलच हे लिखान , पटलच यातलं काही, तर सुरुवात करावी स्वतः पासून.
    मनाशी म्हणून नका, असा वागला तर आमचा टिकाव कसा लागणार ! Define your definition of Success . कोणी वाईट वागल्यास आपण टिकाव धरू शकणार नाही असे वाटले , तर तोलावे स्वतःला आणि अपेक्षांना. बघावे समाधान . योग्य मार्गांनी मिळविलेले अमुक एक माझ्यासाठी समाधान कारक आहे ; हे जर कोणाला वाटलं तर मला नक्की कळवा. 
     असा एक प्रामाणिक रिप्लाय ; हे खरे यश असेल.
     


Saturday, March 19, 2011

Terrified Japan @ 2011 .................. !!

       10 सेकंदात आपल्याला जीवन देणारे पाणी होते-नव्हते ते सारे गीलान्गृत  करू  शकते  ; याची अनाकलनीय  प्रात्याक्षिके म्हणजे जपान मधील निसर्गाचे हे रौद्ररूप ... !! 
     हिरोशिमा च्या बॉम्ब नंतर झालेली परिस्थिती आणि आत्ताची भीषणता म्हणजे ज्पानिच्न्ह्या अचाट धैर्याच आणि खंबीर पणाचं उदाहरण !  केवळ काही क्षणात नदीत शेवाळ हेलकावे खात असावे, असा दृश्य ; ज्यामध्ये पात्यान्म्ध्ली घर भासवीत अशी घर आणि त्यात असणारी माणसे हेलकावत होती !
     केवळ दहा सेकंदात इतक्या भल्या मोठ्या राष्ट्रातील ती विपुलता  ९ रिश्टर च्या धक्याने मुळापासून हलवून ठेवली ! राष्ट्राच्या प्रगतीचे आणि विज्ञानाचे द्योतक ठरणारे atomic reactors आजच्या पिठीचे आणि कदाचित पुढच्याही काही पिढींचे भवितव्य प्र्श्नाचीन्हांकित करणारे ठरले ! जागतिक मैत्रीचे हात पुढे सरसावून माणुसकीची पुन्हा एकदा पहाट झाली.
     विनाश्कली प्रल्यान्शिवाय आपण कधीच या गोष्टी शिकणारच नाही का ? असे राहिले तर कित्येकांनी वर्तवलेले डिसेम्बर २०१२ प्रत्यक्षात उतरूही शकेल? याची एक झलक होती का ही ?
     सुन्न करणारे वास्तव आणि जपानीच्या खाम्बिर्तेचे कौतुक ; याशिवाय पुढे शब्दच नाहीत ....... !!

 

Saturday, March 5, 2011

सुख आणि दुखः ...


आयुष्यातला हा एक कोपरा. सुख आणि दुखः !

आज आम्ही बाग बघत होतो त्यांची . ओळखीची , अनोळखी एक न अनेक चिक्कार झाडे, रंगीबेरंगी फुले .. . प्रत्येकच रंगरूप वेगळा आणि त्यांचा स्वतःच असा वेगळेपण होतं. कित्यिक जुन्या आठवणी हरेक वासाच्या झुळूकेनिशी दडून आल्या. गप्प्पा , बडबड यांमध्ये वेळ कसा निघून गेला कळलेच नाही !
  घरी येऊन रूम मध्ये बसले ; नेहमीसारखा निवान्त पणा , वार्रयाची झुळूक , गल्लीत ली तुरळक लोकांची हालचाल ; एक ओळखीच , विश्वासाचं , आपलेपणा वाटणार असं ते वातावरण ! पण समोर नजर जाताच वाटलं ती रंगीबेरंगी फुले माझ्याकडे का नाहीत ! एक एक रंगचाता किती लोभस , हवीशी वाटणारी ! खूप विचार केला , कुठली खाते घालावीत पासून कुह्तली झाडे लावावीत इथपर्यंत ! ऋतू , हवा , पाणी , अजून काय काय करू काय नको .. विचारात अंधार कधी झाला कळेना . झोपताना उशासारखा हाच एक विचार . कुशीवर कूस बदलत होती , टीक-टीक करणारे घड्याळ हि दुडू - दुडू पुढे प्लावेसे पळत होते.
             किती वेळ लागली कि नाही लागली झोप कोणास ठाऊक ! फाटे जग आली अन पडदा सरकवला .. आह्हा !! कित्त्त्तत्ती टवटवीत हवा , पहाटेचा एक वेगळाच तजेला घेऊन ..! झोप झाली नसली तरी परत लोळत पडावेसे नी वाटले मुळीच . भला मोठा ग्रील उघडून नुस्ती उभी राहिले खरी. हातावर वार्याच्या झुळकेने किंचित हलणारा कडीपत्ता लहान मुलाने खुनावावे तसे खुणावत होता. केवढा मोठ्ठा झाला हा कडीपत्ता ! कोपऱ्यात बघितले ते जरबेरा सारखे दिसणारं एक राणी कलर च फुल तुकतुकीत उभा होतं ! म बघितलाच नाही काळ ! वास नाही म्हणून ! कि ते एकटाच दिमाखात उभा होतं म्हणून ! आणि एवढ्या सगळ्या हिरवळीत ते लालचुटुक फुल कसं राजबिंड तोरा मिरवत होत ! आणि त्या पर्यटक झाडाच्या पानांची देखील कशी नाना - विविध रंग छतांची कशी स्पर्धा चालू होती जणू ! आणि त्या हिरवागार मोगऱ्याला बाई ! किती त्या चिमुकल्या कळ्या ग त्या .. !  लपून बसल्या होत्या त्या पानांच्या हिरवळीत ; म्हणून म त्याही नाही बघितल्या !
                     कधीही पाणी न घालता तलवारी काढून उभारलेला कोरफड एकमेव . कितीही तीव्र उन्हाळ्यात तितकाच गारवा देतो डोक्याला लावला की ! उंची भर वाढलेला हाच कडीपत्ता पोहे कसे झकास फक्कड करतो ! इमारती खालून  लांब वर पहिला तरी तो लाल चुटूक लॉरेन्स सगळ्यांच्या नजरेत भरतो . एक चिमणी मोगर्याची काळी केवढा तरी सुगंध अंड शांत पणा देते !
                     सगळकाही असण्यापेक्षा आणि काहीच नसण्यापेक्षा ; माझ्याकडे खूप काही होतं . बघायचं राहून गेलं; की काळोखामुळे नजरेतून निसटत होतं कोणास ठाऊक !

Monday, January 10, 2011

Aathwanitlya kavitaa .. 1.1 .. "आठवण"


आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
आठवण
आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची...........
..............................................................

Aathwanitlya kavita..

तू भेटशील तेंव्हा,
खूप काही बोलायचे आहे..
थोडे फार भांडण आणि,
खुपसे प्रेम करायचे आहे...
प्रत्येक विरहक्षणाचा,
तुला जाब विचारायचा आहे...
तो हरेक क्षण मला,
व्याजासकट वसूल करायचा आहे..
मनी साठवलेल्या क्षणांचा
एकेक पदर उलगडायचा आहे..
तू न केलेल्या प्रत्येक फोन ची,
तुला शिक्षा द्यायची आहे...
इतके दिवस जातात का दुर?
म्हणत मी तुला रागवणार आहे,
माझ्यशिवाय कुठेही जाऊ नयेस
अशी सॉलिड धमकी देणार आहे..
पण हे सारे...
तू भेटशील तेंव्हा... !!
सध्यातरी तुझी वाट बघणे,
हा एकच छंद जिवाला जडला आहे.........

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...