loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label ketki itraj. Show all posts
Showing posts with label ketki itraj. Show all posts

Wednesday, September 10, 2014

" Being Wise & Smart : इथे सपशेल मना आहे ! "

                                     

इतकं शहाणं आणि जबाबदार कोणी होऊ नये.  समजूतदार  माणसाचा सदरा घालून कोणी फिरू नये.  परमेश्वर एकदाच का देत असेल लहानपण ? आपण ते जपायलाच शिकलो नाही तर ? आई वडिलांचे छत्र  आणि पाठीत बसलेले धपाटे कशाला निर्माण केले असते ? निरागस हसू आणि द्वांड दंगामस्ती विरून का गेले नसते कधी ! इतके खट्याळ , मिश्किल लिहिणारे नामवंत लेखक जबाबदार नव्हते का कधी ? Tom  & Jerry  बघत हसणारे तुमचे आई -वडील दिसले नाहीत का कधी ?जबाबदारीच्या नावाखाली काय गमाव्ताय ? लाख - दोन लाख पगारात अकाली वार्धक्य विकत घेताय ?

हासत जगणं हे मोठ आव्हान आहे. खूप मोठ होऊन लहान रहाणे यात सार सूख आहे. दुसर्यांना हसवणे हे आयुष्य जिंकल्याच लक्षण आहे. भूमिका बदलत रहातील. आपला अनुभव , शिक्षण ,  मन , सौस्कार , समाजातील निरनिराळे घटक आपल्याला अनेक गोष्टी शिकवत रहातील. भूमिका कशा हाताळाव्यात , हे तुमचं batting skill आहे . स्वतःला विसरून जीवन जगणे सर्वात गैर आहे. प्रश्न पैशांचा नाही , कावर्या -बावर्या होणार्या मनाचा आहे. मोठे -मोठे म्हणत ओंठ काढून रडणाऱ्या आपल्यातल्या निरागस पोराचा आहे.

Wednesday, February 12, 2014

खड्डा

 खड्डा

प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा हा अतीव महत्वाचा  असतो.
खड्डा ह्या गोष्टीचा नेमका अर्थ जे पुणेरी लोक याचा चपखल वापर करतात त्यांनाच माहित असून बाकीच्यांना याचा सुगावा देखील लागत नाही ; या गोष्टीचा भयंकरच फायदा होतो. तणाव - नियमन , Anger - Control & Stress Management वगरेंच्या कार्यशाळेत जाण्याची गरज पडत नाही. राग आल्यास मोठ्याने हसणे वगरे तत्सम गोष्टींची चित्रपटात बघून सवय करून घ्यावी लागत नाही. आयुष्यात अनेक अमुलाग्र बदल घडविण्यासाठी " खड्डा " अतिशय महत्वाचा ठरतो. आजच्या जगात वय वाढण्याच्या लक्षणांमध्ये केस पांढरे होणे , सुरकुत्या पडणे इत्यदि बरोबरच मनापासून निखळ हसण्याचे प्रमाण कमी होणे हा देखील निकष महत्वाचा ठरत आहे. तरी या अनुशंघाने विचार केल्यास मनापासून खळखळून आणि उफाळून -उफाळून हसवण्यासाठी कारणीभूत ठरणारा हा शब्द " खड्डा" - हा चिरतारुण्याचे रहस्य

Tuesday, November 26, 2013

About - ITRAJs

Dear All,
Was planning for this post since long.
Simply providing some info useful for ITRAJs  and  other people who want to know about ITRAJs.

ITRAJ
Mula-purush:  Yatiraaj.

Origin: Every ITRAJ should be proud to know that we belong to one of the Ucch-Rajkulas. Our Ancestors were in service of Raje-Nimablkar @  Satara. We were looking after a very famous Shri-Ram temple @ Phaltan.

Special Historical Limelight: " Jiwant-Samadhi"

Every ITRAJ should know that one of our ancestor has taken a "living-samadhi" ( Jiwant_Samadhi) at Phaltan. Hardly few are aware about. There is no tile / information displayed yet regarding indication of "Jiwnat-Samadhi" at that place. Any ITRAJ interested can do it willing fully. It is a part of preserving glorious pages of History of ITRAJ family.

Evidences: Mr. Suhas Sadashiv Itraj is still residing at Phaltan. Also taking care of "Shri-Ram".   temple over there as much as possible. He is one of the famous entity in local area ; well known as " Suhas-Kaka" . He is working with local media as well. During his research ; he has found original documents in "MODI" language referencing association of ITRAJs with "Raj-Kulas". Anyone interested can contact him regarding more info.  


Cast: Hindu Brahmin
Sub-cast: Deshastha Rigwedi
Original Place: Phaltan, Satara, Maharashtra, India.
Family God ( Kuldaiwat ) : Khandoba@ Naldurg. Near Tuljapur.
Family Goddess (Kuldewata ) : Tuljabhavani @ Tuljapur.
Guest Lord : Lord Shri-Ram. 

Kuldharma- Kulachar :

1. Those who have "Taak" of family god and Goddess are expected to do tuljabhavani Nauratri.
2. Every ITRAJ can celebrate 9 days festive of " Shri-Ram" Nauratri.  This is celebrated 9 days prior "Ramnawmi" . We have Lord Shri-Ram as a guest lord in our family from " Nimbalkar-Raaje".
3. While performing routine "aarti's" as a part of worshiping  kindly remember to do "aarti" of Lord-Khandoba. This is often missed as not a part of routine bunch of aarti's.
4. Every ITRAJ can celebrate 10 / 11 days ( Till Anant-chaturdashi)of "Shri-Ganesha" Festival.
5. As far as "Mahagauri-Puja" is concern every ITRAJ is expected to check with their parents/grandparents regarding trends in their sub-domain.

How did "ITRAJ" Sir name  appear?
1. Based on MUL_PURUSH. As he was one of the senior and respectable Rishi (called aas Yati in  sanskrit ) ; Yatinche Raaje = Yatiraj was a pronunciation. However along with time it was miss-pronounced and finally established on paper as " ITRAJ".

Friday, August 2, 2013

Aamchya Punyacha Paus !

पावसाळा किंवा आवडता ऋतू यावर शाळेत निबंध लिहिला असेल मी बर्याचदा . पण आज आमच्या पुण्याच्या पावसावर लिहिते. केतकी इतराज आणि पावसाचा काय संबंध ते आधी बघू ! :D
कधीही पावसात चिंब भिजायला आवडते अशी " ती " म्हणजे केतकी इतराज ( म्हणजे मी :D )

लहान असताना हुजुरपागेतून ( शाळेचे नाव ) नारायण पेठेतल्या घरी म्हणजे बेताचेच अंतर. मग सगळ्या लक्ष्मी रोडला प्रदक्षिणा घालून मग आमची स्वारी भिजत घरी येत. :D येताना साडेतीन रुपयांची क. दा . खायची गरम गरम ! झकास ! :D  शाळेचा पहिला दिवस - ७ जून . नवे रेनकोट घालून शाळेत जायचे या पिढीचे स्वप्न साकारायला या वर्षी मान्सून वेळेत दाखल झालेला आहे. हे भाग्य माझ्या पिढीला नेहमीच लाभले. शाळेत नवे पावसाळी फ्लोटस आणि गुढघ्या पर्यंत स्कर्ट घालून जायचे. वर्गात सार्यांचे निथळत लावलेले रेनकोट खिडक्यांच्या दारांची शोभा वाढवत :D काय मस्त असतो नव्या रेनकोट चा वास ! झक्क !
मी भिजून शाळेत बसले आहे. चित्रकलेच्या वर्गात , मधल्या सुट्टीत , लायब्ररीतून धावत बाहेर येउन सुद्धा मी भिजले आहे. शाळेतला पाउस नेहमीच धमाल होता.

पुण्याचा पाऊस  ………. ! तर , अजूनही पाणी बघायला बा . पुं . वर जाणे म्हणजे पुण्याचा पाऊस . आमच्या ओम्कारेश्वारास नदीचे पाणी लागणे म्हणजे पुण्याचा पाऊस . भिडे पूल पाण्याखाली गेला ; म्हणून माझे कोलेज बुडले आहे. आजी माझी - ओमकारेश्वराजवळ रहाते न … नारायण पेठेत . तेथे " नदीपात्रा जवळील लोकांना सतर्कतेचा इशारा ! " असे सांगत फिरणाऱ्या कॉर्पोरेशन च्या गाड्या बघत थांबणे म्हणजे पुण्याचा पाऊस. आमचे आजोबा 1९६२ च्या पुराच्या रिअल स्टोरीज पण सांगतात मग .

Tuesday, June 18, 2013

Best B'day Wishes

Wishing you O- dear friend,
a healthy-wealthy life;
on this day of your b'day
may god blase you fine !

May the glory of success
follow you at every time
may the peaks you cross
will give you the further line|

May the touch of divine beauty
be with you all the time
may you get surrounded
with blessings of all guys|

Friday, April 26, 2013

काही रेअर मोमेंट्स -



काही रेअर मोमेंट्स . सध्या भारतातला मे २०१३ . आजची उन्हाळी सुट्टी आणि १५ वर्षांपूर्वीची अशा काही सहजच निघालेल्या गप्पा. आमच्या नारायणपेठेतल्या वगरे आठवणी . अर्थातच त्या एव्हर ग्रीन आठवणी कधीही आठवता याव्यात म्हणून काही बारकावे नमूद करीत आहे . " क्विकली गो थ्रू " टाईपमात्र माझ्या तोंडाचे अखंड चर्हाट ऐकण्यात जी मजा आहे ती येथे नाही. इच्छुकांनी माझ्याबरोबर बिनधास्त गप्पांचा अड्डा मांडवा ..….  :))

प्रकरण - नारायण पेठ

Monday, April 1, 2013

कसबा गणपती- Kasba Ganpati, Pune March 2013

कसबा गणपती. केवळ नाव घेतले तरी चटकन ध्यानी येते ते पुण्याचे ग्रामदैवत , मनाचे १ले गणपती. पुण्यातील सर्वात जुने , अत्यंत ज्वलंत ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे हे श्रींचे अधिष्ठान. अगदी पुण्याची पुनवडी होती तेव्हापासूनचे सार्यांचे लाडके दैवत. आजवर सापडलेल्या अनेक शिवकालीन खत-खलिद्यात तब्बल ७०० वर्षांपूर्वीचे देखील कसबा गणपतीचे "श्री मोरया" या नावाने उल्लेख सापडले आहेत. म्हणजे यादव काळापासून पुणे हे महाराष्ट्रातील कदाचित पहिले गाव असेल , जेथे श्रीं गणेशाचे वास्तव्य आढळून येते.
       मुळा -मुठेच्या संगमावर वसलेले हे देऊळ , पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या समोर अगदी हातभर अंतरावर. पूर्वीपासून पुण्यातील सर्वात जुनी रहिवासी वस्ती म्हणजे पेठ असणार्या कसबा पेठेत.शिवाजी महाराजांच्या घराकडून; म्हणजे आजही मोठ्या दिमाखाने उभ्या असलेल्या लाल महालाच्या फक्त डाव्या हाताला ही वाडा-सदृश्य , ऐस-पैस वास्तू तितक्याच डौलाने उभी असलेली दिसते.या मंदिरावर यादवकालीन आणि हेमाडपंती अशा दोन्ही शैलींचा छाप दिसून येतो. महाराष्ट्रात अकरा ते चौदाव्या शतकापर्यंत  "हेमाडपंती" ही विशिष्ठ मंदिर वास्तुरचनाशैली निर्माण झाली. यादव काळातील एका हेमाडपंत नामक मंत्र्याच्या  नावाशी ही शैली जोडली गेलेली दिसते. आणि साधारण तेरा ते सतराव्या शतकात महाराष्ट्रात यादव - मंदिर शिल्पशैली तग धरून होती . त्यानंतर अठराव्या शतकात पुन्हा नवीन मंदिरे निर्माण होण्यास सुरुवात झाली.  या मंदिराची स्थापना १६२६-१६३९ च्या दरम्यान राजमाता जिजाऊच्या आज्ञेनुसार झाली असे सांगण्यात येते. या मंदिराचे पारंपारिक पद्धतीचे सभामंडप , गर्भगृह आणि गोपूर पद्धतीचे शिखर, मंदिरासमोरची दीपमाळ ही वैशिष्ट्ये मराठा राजवटीचा विशेष ठसा प्रकर्षाने जाणवून देतात.
Kasba Ganpati- Under Makeover-Feb2013-Photography by Ketki Itraj

Kasba Ganpati- Under Makeover-Feb2013-Photography by Ketki Itraj

Monday, March 18, 2013

एक उनाड संध्याकाळ


शनिवार. १६ मार्च २०१३. पूर्व नियोजनाशिवाय आईन्वेळी ठरवून एफ. सी. रोड गाठायचे ठरले. आभाळ ढगाळलेले ;( thanks for god ) उन्हाचा लवलेश नव्हता . पूर्वी गरवारेला असताना दर शनिवारी black घालायचो ; ठरवून :) या शनिवारी न ठरवता black घातले आणि ते सेम पिंच झाले. पूर्वीसारखा टाइट top, black वर ऑफ व्हाईट जीन्स न घालता blue घातलेली . बंटी और बबली - मिरर वाली orange शबनम गळ्यात तिरकी आडकवलेली. काळ्या - निळ्या - पांढर्या  पायापेक्षा जराश्या मोठ्या पट्टेरी चपला घातलेल्या .

१. पुन्हा एकदा .....निघताना मिस कॉल
२. पुन्हा एकदा ....... मी गाडी नेताना बाबा ओरडत होते. गाडीची किल्ली उशीखाली ठेऊन प्रडले होते.
३. " तू परत धड्काव्णार कुठेतरी " म्हणत असताना मी गाडी काढली.
४. पुन्हा एकदा पाय पूरत नसताना भन्नाट गाडी मारली ! ;)
५. पुन्हा एकदा --- मी लेट च होते. ;) :-p
६. ग्रीन आणि ग्रे नेल पेंट्स च्या शेड च्या शेड उचलल्या.
७. दोघीत एक पाणी पुरी --- ( पैसे बचाव .... त्याबाबतीत मी बदलणार नाही :-p )
८. आवडले म्हणून एकाच टाइप चे २ tops घेतले. :)
९. बारगेन न केल्यामुळे काहीसे रुख रुख लागून राहिले.
१०. सगळ्या शेड्स आधी आईच्या नखांवर ट्राय केल्या :-p

स्पष्टीकरण :

१. माझ्या कोलेज मधील जुन्या मैत्रिणीलाच भेटले होते :-p
२. १० वर्षांपूर्वी मी फ्रेशर ड्रायव्हर असल्याने बाबा ओरडत. तेव्हा लायसन शिवाय मी पळवलेली गाडी आणि पुढचे दिव्य माझ्या त्या वेळच्या मैत्रिणीला अजूनही आठवेल ;-p  कारण कॉलेज ची लेक्चर्स आम्ही गरेज मध्ये अटेंड केली :-p

Sunday, March 17, 2013

माम अनुस्मरम युधश्च्य- Complete Article

रामरक्षेचे पवित्र शब्द , सूर , ध्वनी उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत असणारी प्रभू रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता विश्वास बसत नाही की हे ही माझ्या ह्याच माधवाचे रूप ! एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरीने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण !! ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण! हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो !
      युद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का ? विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते ?!! हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.
तत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे लोक , त्यांच्या मनाची एक नाडी तो अचूक हेरून होता. सद्वर्तनी सहवासात राहणे सोपे ; मात्र प्रचंड विद्या , शक्ती , बल , सामर्थ्य , संपत्ती असणार्या एक नव्हे अनेक पातळयांत्रि, खल प्रव्रीत्तीच्या कुळांशी , अथि-रथी-महरथिन्शि , जेष्ठ, प्रिय-अप्रीयांशी , योध्यांशी , राजाकुलांशी कोणाचेही मन दुखावता त्याला सुधार्माने वागायचे होते. कृष्ण म्हणतो , " प्रत्येकाने पुण्य कमविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून अरण्यात तपस्या करावी असे मुळीच नाही . प्रत्येकाने आपल्या धर्माचे (अर्थात कर्तव्यांचे) पालन करणे हेच त्याचे पूण्य. नियती नामक काही नसतेच. प्रत्येक जीवाचे पूर्व - जन्मींचे आणि या जन्मीचे कृत्य त्याचे आयुष्य असते. म्हणूनच आपले आयुष्य घडविणे  आपल्याच हातात असते. " महाभारतातील बहुतौश  पात्रे थोर , महान , बुद्धिवान , कर्तव्यदक्ष होती. त्यांना , त्यांच्या मानवी-स्व्भाव्जान्य भावनांना योग्य ती दिशा देण्याचे काम फक्त कृष्णाचे. साऱ्यांत राहूनही सार्यातून वेगळा राहण्याचे कौशल्य त्या ईश्वरी अवताराचे.

Thursday, February 21, 2013

Cooking with " Ketki Itraj" ;) ( For a change ;) :-p )

HI all, Credit of developing a true cook in me goes to :
1. My Mom's Bank - She was unexpectedly transferred out of Pune.
2. My Mom- Who has been cooking fantastically throughout my birth & made me so much used to eating highly yummy , healthy and variety of food. This addiction of eating yummy , healthy and variety of food forced me to cook the way I want & the Dish am crazy about !
3. Aamhi Sare Khawayye- Zee marathi cooking show which actually made me - " Khawayye "
4. Dr. Vrushali sis - Who guided me so well about art & science of cooking & made me aware about the fact that medico s should never be on a back-foot on any front ;) Apart from being out of Pune , she was / is my very best motivator till date. :)

My handmade 1st "Ukdicha Modak" in Life..@Gauri-Ganpat2012
Suralichya Wdya: Once upon a time , I did it !! Lol ;) 2012

                                    
Egg Recipe- Akuri Sandwich (Eat with Indian Bread= Wheat Poli / Tortilla / other breads )

Yeh...Egg Recipe Akruri.. Fantastic Nutritional Brunch... Its a dietitian's recommendation !

Sunday, February 17, 2013

Monday, February 11, 2013

दुष्काळाचा ओव्हर व्ह्यू -2012-2013

आता फेब्रुवारी २०१३. पाऊस नाही म्हणून जी बोम्बाबोम्ब चलुए ती थेट या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत. सलग २ वर्ष दुष्काळात लोक भरडले जात आहेत. सरकार , मध्यस्त यांमध्ये जनावरे , पीके आणि मनुष्य भरडले जात आहेत.

दुष्काळाचा ओव्हर व्ह्यू  -

१. दुष्काळ आहे किवा नाही यावर वाद , शंका , मतभेद
२. किती टक्के , किती तालुक्यात यावर वाद , चर्चांना
३. पाणी पुरविणाऱ्या , जनावरांना चारा पुरविणाऱ्या व्यवस्थेवरून आणि व्यवस्थापनावरून वादंग चालू
४. लोकांना कित्त्येक ठिकाणी ८-१० दिवसातून एकदा पाणी मिळत. तुकाराम - या जितु जोशी च्या नव्या मराठी चित्रपटा सारखा दुष्काळ महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी आहे.
५. अनेक गावातून माणसे स्थलांतर करीत आहेत , गावे ओस पडीत आहेत
६. पिण्यास पाणी नाही , लांबवर विहिरी कोरड्या , जनावरांना चारा नाही , जनावरे खंगून मरत आहेत


Wednesday, February 6, 2013

" माम अनुस्मरम युधश्च्य "

       आयुष्यातली आपली priority कशाला आहे ? फार विचार करावा असे नाही.  थोडक्यात म्हणजे आपले सूख कशात आहे ?प्रत्येकाचे सूख समाधानात आहे. सूख मिळेल का हो बाजारी ?? !! कधीच नाही !
कारण सूख आणि समाधान म्हणजे गोगल गाईच्या पाठीवरचे घर !
        मी लहानपणी कित्येक वक्तृत्व स्पर्धांत , निबंधात अनेकदा वापरले असूनही मी हे का विसरते !
                          "तूझे आहे तुजपाशी ; तरी तू जागा चूकलासी" .......  :)
समाधान पैशात का कधी मापता येईल ? पारड्यात का कधी तोलता येईल ? मार्कांच्या बेरजेत का कधी गवसून जाईल ? परा आणि अपरा ..... ! अशाश्वत , क्षणभंगुर गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे मोह. मोह आला की सूडचक्राचे अविरत चालणारे चक्र सुरु ! जो अडकला , गुंतला .....तो  गुंतलाच ! 
स्वतः च्या कर्मावर विश्वास ठेऊन अथक परिश्रम करीत राहणे ; एवढेच काय ते आपण करावे . बाकी सारे "त्याच्यावर!"
                               " माम अनुस्मरम युधश्च्य " ..............


Friday, January 25, 2013

महाभारत... आयुष्याचा मला उमगलेला नवा अर्थ


     रामरक्षेचे पवित्र शब्द , सूर , ध्वनी उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत असणारी प्रभू रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता विश्वास बसत नाही की हे ही माझ्या ह्याच माधवाचे रूप !
सत्युगात एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरी ने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण !! ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण! हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो !
               



           युद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का ? विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते ?!! हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.

Thursday, November 22, 2012

ताक फुंकून पिणा र्याचा किस्सा !

   मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
     काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.

Monday, October 22, 2012

गाडी लागते ? प्रवासाची भीती ? माझ्या काही टिप्स - थेट माझ्या अनुभवातून !

पूर्व तयारी करताना :
१. गाडीत प्रवासासाठी बसण्याआधी १ - दीड तास आधी कोरडे , कमी मसाल्याचे खाऊन घेणे.( कोरडा नाश्ता )
२. चहा / कोफी / लिंबू सरबत मुळीच घेणे नाही.
३. उपाशीपोटी मुळीच प्रवास करू नये.

प्रवासात :
१. जास्त पाणी / पात्तळ पदार्थ नको. कोल्ड ड्रिंक्स , मिल्क शेक , जूस , मिल्क , ताक, लस्सी नको

Tuesday, October 9, 2012

बनगरवाडी - अप्रतिम ग्रामीण कादंबरी

सौदणकर मास्तर गावाकडे बदली झाल्यावर त्यांच्या ग्रामीण स्थानी पोहोचतात . एक ओसाड माळरानावर वसलेली धनगर वस्ती - बनगरवाडी . आजच्या युगात कल्पनातीत वाटेल असे सारे जिवंत वर्णन. आजकालच्या मॉल सौस्कृतीतल्या मुलांनी आव्व्र्जुन वाचावे असे पुस्तक.
आयुष्य म्हणजे काय , आयुष्य जगताना अडचणी येतात म्हणजे काय , कागदावर रंगाच्या जितक्या छटा असतील ; तितक्याच किंबहुना जास्तच छटा आयुष्याच्या हि असू शकतात. खरोखरीच असा अनुभव घेणा शक्य नाही , घेणे आपल्याला मावणार- सोसाविनारही नाही ;)
गाव , गावातील धनगर आणि इतर उद्योग करणारा समाज याची पूर्व- परंपरागत असणार गाव- रचना . गावातील समूहाचे वागणे , राहणे , हसणे , खेळणे. हसू आणि आसू एकत्र झेलणे. खूप काही वेगळे वाचनात येते. आणि माडगुळकर यांची ग्रामीण भाषा शैलीवरील प्रचंड पकड हर एक पत्र आपल्या समोर जीवन , चालते-बोलते करून ठाकते.

Sunday, September 30, 2012

Punyache Ganapati aani wisarjan mirawnuk 2012

        अनंत कामे असूनही आवर्जून लिहिण्यास वेळ काढावाच लागला. नैतिक जबाबदारी ! अनंत चतुर्दशी ! पुण्याचे गणपती विसर्जन ! लहानाची मोठी नारायण पेठेत झालेल्या मला या सोहोळ्याचा अद्वितीय , भारावून टाकणारा अनुभव चांगलाच माहित आहे , अनुभवात आहे.

सहा वर्षांपूर्वीचे गणपती 
         नारायण पेठेत असताना गणेश चतुर्थी ला कसबा गणपती ; जे आमच्या पुण्याचे ग्रामदैवत आणि मनाचे पहिले गणपती आहेत ; ते सकाळी आमच्या दारावरून जात. हमाल वाड्यातून बाहेर निघून कोणीतरी बसावयास जागा पकडून ठेवीत. मग मी , माझही आते-चुलत भावंड , गल्लीतले मित्र मैत्रिणी, आम्ही तेथे जाऊन बसत असू. घरचे गणपती बसल्या नंतर ! दुपारी ४ - ४: ३० पर्यंत बसून मनाचे गणपती , रांगोळ्यांच्या पायघड्या , ढोल-तश्या नची पथके बघित आम्ही घरी येत. मग बाहेरगावचे नातेवाईक मुन्जोबाच्या बोलाच्या येथून मुख्य रस्त्याला काही वेळ मिरवणूक बघित. काहीतरी चटक-मटक भेल वगरे खून ते रवाना होत. आम्ही गणपती बघण्यासाठी १० दिवस फिरत असू. गौरी असल्याने गौरींचे आगमन, जेवण , हळदीकुंकू यातच इतके मोट्ठे काहीसे वाटत असे; कि बस! आमच्यासाठी ते सारे दिवाळीपेक्षा अंड दायी , सुखावह. गौरींचे विसर्जन झाल्यान्नात्र मात्र रात्री भटकायचे ! एकदा शाळेत असताना ( हाय स्कूल मध्ये बर का ) १४ लोकांचा चमू जुळला. रात्री १ वाजता गंधर्व हॉटेल मध्ये साग्रसंगीत पंजाबी दिश घेऊन जेवण केल्याचे आठविते. एकदा माझ्या आते बहिणी बरोबर भाताक्ल्याचे आठविते. कोपर्यावर च्या गाड्यांवर १० रुपयात झकास SPDP वगरे हनली; रात्रौ १२ ३० चे सुमारास. बाबांबरोबर गणपती बघणे ; याची वर्णने करता येणार नाहीत.  हत्ती गणपती, बाबू गेनू, हिराबाग विशेष. टिळक वाद्याचा गणपती आधी होत. तेव्हाही तेथील सौस्कृतिक कार्यक्रम बघण्यास आम्ही आवर्जून जात असू. आभाळमाया जोरात चालू असताना सुकन्या कुलकर्णी , संजय मोने यांना बोलाविले होते. मजा ! पत्र्या मारुती च्या स्पर्धेत माझह धाकटा भाऊ लिंबू-चाचा मध्ये जिंकला. मात्र मागून हि बिचार्याला बक्षीस सुपूर्त करण्यात आले नाही. :)) आणि अनंत चातृर्दशीला साश्रू नयनांनी आम्ही आमच्या गणपतींचे विसर्जन करून मग नातेवैकांसह लक्षुमी रोड ला जात असू. आमचा केबल वाला , व्हीनस केबल ... त्याच्या कामेर्याचा शोध लागला कि तेथे उभे रहावयास मिळत. तेव्हा केबल २५०-३०० रुपये महिना असे. माझ्या चुलत बहिणीच्या मैत्रिणी मलाही नेत बरोबर. त्या त्या असत. मी लहान मुलगी. म्हणजे दोघेही उत्साही ! दगडूशेठ च्या रथाप्र्यंत कडे कडेने जाऊन परत यावयाचे. आणि पाहते साडेतीन वाजता दग्दुषेत आमच्या घरासमोर , लक्ष्मी रोड वर येत . केबल वर बघायचे. आणि मग समोर जाऊन दर्शन घ्यावयाचे. :)  या सार्यांमध्ये आमच्या शेजारच्या शेजारचा वाडा झकास होता. बिल्डींग झाली असली तरी तो वडाच! त्यांचा गणपती असे सोसायटीचा. सभासद चांगले सगळे. मुले- मुलीही उत्साही. त्यातली एक जन माझ्या शाळेत मला जुनियर. हाय - बाय चालत. " सगळ्यांनी आरतीला चला SSSSSSSSSSSSS " हे त्यांच्या वाड्यात रोज रात्री घुमणारे नित्याचे सूर. काय आरत्या होत ! झकास !

२०१२ चे गणपती:

आता आम्ही पेठ सोडून ६ वर्षे झाली. शांतता! श्रींचे विसर्जन येथे चार चाकीतून होते. प्रेम कमी नाही हो! " सगळ्यांनी आरतीला चला SSSSSSSSSSSSS " हे पालुपद मी स्वतः माझ्या घरात आजवर चालू ठेवले आहे. विसरल्यास आमचे बंधुराज आवर्जून सांगतात , " केतकी , जरा आवाज दे बर तुझा ! " :)) गणपती बघायला आम्ही गेलो कि या वर्षी. मैत्रिणी आणि परिवार. आवर्जून खरे नमूद करीत आहे.

Saturday, September 15, 2012

History of Indian Currency- British TIme

Victoria Portrait Series

The first set of British India notes were the 'Victoria Portrait' Series issued in denominations of 10, 20, 50, 100, 1000. These were unifaced, carried two language panels and were printed on hand-moulded paper manufactured at the Laverstock Paper Mills (Portals). The security features incorporated the watermark (GOVERNMENT OF INDIA, RUPEES, two signatures and wavy lines), the printed signature and the registration of the notes.
Image : Rupees Ten Image : Rupees Hundred

Rupees Ten Rupees Hundered

British India Notes facilitated inter-spatial transfer of funds. As a security precaution, notes were cut in half. One set was sent by post. On confirmation of receipt, the other half was despatched by post.

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...