loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label popular marathi blogs. Show all posts
Showing posts with label popular marathi blogs. Show all posts

Wednesday, February 12, 2014

खड्डा

 खड्डा

प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा हा अतीव महत्वाचा  असतो.
खड्डा ह्या गोष्टीचा नेमका अर्थ जे पुणेरी लोक याचा चपखल वापर करतात त्यांनाच माहित असून बाकीच्यांना याचा सुगावा देखील लागत नाही ; या गोष्टीचा भयंकरच फायदा होतो. तणाव - नियमन , Anger - Control & Stress Management वगरेंच्या कार्यशाळेत जाण्याची गरज पडत नाही. राग आल्यास मोठ्याने हसणे वगरे तत्सम गोष्टींची चित्रपटात बघून सवय करून घ्यावी लागत नाही. आयुष्यात अनेक अमुलाग्र बदल घडविण्यासाठी " खड्डा " अतिशय महत्वाचा ठरतो. आजच्या जगात वय वाढण्याच्या लक्षणांमध्ये केस पांढरे होणे , सुरकुत्या पडणे इत्यदि बरोबरच मनापासून निखळ हसण्याचे प्रमाण कमी होणे हा देखील निकष महत्वाचा ठरत आहे. तरी या अनुशंघाने विचार केल्यास मनापासून खळखळून आणि उफाळून -उफाळून हसवण्यासाठी कारणीभूत ठरणारा हा शब्द " खड्डा" - हा चिरतारुण्याचे रहस्य

Friday, January 25, 2013

महाभारत... आयुष्याचा मला उमगलेला नवा अर्थ


     रामरक्षेचे पवित्र शब्द , सूर , ध्वनी उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत असणारी प्रभू रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता विश्वास बसत नाही की हे ही माझ्या ह्याच माधवाचे रूप !
सत्युगात एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरी ने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण !! ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण! हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो !
               



           युद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का ? विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते ?!! हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.

Thursday, November 22, 2012

ताक फुंकून पिणा र्याचा किस्सा !

   मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
     काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.

Sunday, June 17, 2012

Nik Vallenda & Nigra falls........ !!

I reallllllllly..........reallllllly................admire this person................... !!

Must have done much of pranayam / some techniques & exercises for maintaining atmost balance & concentration......... !!!




Friday, May 27, 2011

लहानपण देगा देवा ...........

हे जीवन सुंदर आहे ....... ! हे स्मिता तळवलकरच किती सुंदर गाणे ! कधीतरी याच नाण्याची दुसरी बाजूपण दिसते. माणूस मोठा होतो ; घरापासून शाळेपासून ऑफिसातल्या कामात गुंततो. आजुबाजूच वातावरण बदलत , आजूबाजूचे लोक बदलतात. मित्र -मित्र म्हणणारा कधी पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याच  गुपित आई ला सांगतो, कधी ऑफिसात चुगल्या करतो. कटकटी असतात ; सगळीकडेच. पण वयाबरोबर , आपल्या यशाबरोबर हि कटकटीनची तीव्रता वाढत जाते. 
     गम्मत आहे ! आपले आई बाबा , आप्तजन, आपल्या शाळेतल्या बी सारे जण असताना आपल्याला जपले जाते हळुवार तळहाताच्या फोडासारखे. आणि नाण्याच्या दुसर्या बाजूची सुरुवात होते ; so called " मोठ झाल्यावर " .. ! 
     तस म्हणलं तर प्रत्येकाला एकमेकांची गरज असते. कोणीतरी कोणालातरी त्रास देत असत. कोणीतरी कोणाचा तरी खांदा शोधत असतं. मग त्रास देणारेच खांदा देणारे का नाही होऊ शकत ? त्रास देणार्यांना असा वागण्यास कोण प्रवृत्त करते? यशाची अतिरिक्त हाव , सौज्ञा हरविलेले यश शोधण्याची व्यर्थ धडपड , चुरस , इगो,  पायखेची मनोवृत्ती, दडपण , एकाकी पण , व्यसनाधीनता , सारासार विचार करण्याची क्षमता हरविणे, गैर मार्गाने विचार करणे.... आणि बस ! चक्र सुरु ! 
      केवळ मनातून स्वच्ह राहिल्याने जगातील कित्येक हृद्य विकार टाळतील, माणूस  मन्सासची माणसासारखा वागल्याने तणाव, दडपण आणि कित्येक मनोविकार टाळतील. काम करणे आनंदमय होईल , एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद द्विगुण करता येईल. 
     तम वृत्तीच्या , वाम मार्गाला लागून आपण स्वतः आपल्या आयुष्याचे नुकसान करीत आहोत. कोणी वाचलच हे लिखान , पटलच यातलं काही, तर सुरुवात करावी स्वतः पासून.
    मनाशी म्हणून नका, असा वागला तर आमचा टिकाव कसा लागणार ! Define your definition of Success . कोणी वाईट वागल्यास आपण टिकाव धरू शकणार नाही असे वाटले , तर तोलावे स्वतःला आणि अपेक्षांना. बघावे समाधान . योग्य मार्गांनी मिळविलेले अमुक एक माझ्यासाठी समाधान कारक आहे ; हे जर कोणाला वाटलं तर मला नक्की कळवा. 
     असा एक प्रामाणिक रिप्लाय ; हे खरे यश असेल.
     


Saturday, March 5, 2011

सुख आणि दुखः ...


आयुष्यातला हा एक कोपरा. सुख आणि दुखः !

आज आम्ही बाग बघत होतो त्यांची . ओळखीची , अनोळखी एक न अनेक चिक्कार झाडे, रंगीबेरंगी फुले .. . प्रत्येकच रंगरूप वेगळा आणि त्यांचा स्वतःच असा वेगळेपण होतं. कित्यिक जुन्या आठवणी हरेक वासाच्या झुळूकेनिशी दडून आल्या. गप्प्पा , बडबड यांमध्ये वेळ कसा निघून गेला कळलेच नाही !
  घरी येऊन रूम मध्ये बसले ; नेहमीसारखा निवान्त पणा , वार्रयाची झुळूक , गल्लीत ली तुरळक लोकांची हालचाल ; एक ओळखीच , विश्वासाचं , आपलेपणा वाटणार असं ते वातावरण ! पण समोर नजर जाताच वाटलं ती रंगीबेरंगी फुले माझ्याकडे का नाहीत ! एक एक रंगचाता किती लोभस , हवीशी वाटणारी ! खूप विचार केला , कुठली खाते घालावीत पासून कुह्तली झाडे लावावीत इथपर्यंत ! ऋतू , हवा , पाणी , अजून काय काय करू काय नको .. विचारात अंधार कधी झाला कळेना . झोपताना उशासारखा हाच एक विचार . कुशीवर कूस बदलत होती , टीक-टीक करणारे घड्याळ हि दुडू - दुडू पुढे प्लावेसे पळत होते.
             किती वेळ लागली कि नाही लागली झोप कोणास ठाऊक ! फाटे जग आली अन पडदा सरकवला .. आह्हा !! कित्त्त्तत्ती टवटवीत हवा , पहाटेचा एक वेगळाच तजेला घेऊन ..! झोप झाली नसली तरी परत लोळत पडावेसे नी वाटले मुळीच . भला मोठा ग्रील उघडून नुस्ती उभी राहिले खरी. हातावर वार्याच्या झुळकेने किंचित हलणारा कडीपत्ता लहान मुलाने खुनावावे तसे खुणावत होता. केवढा मोठ्ठा झाला हा कडीपत्ता ! कोपऱ्यात बघितले ते जरबेरा सारखे दिसणारं एक राणी कलर च फुल तुकतुकीत उभा होतं ! म बघितलाच नाही काळ ! वास नाही म्हणून ! कि ते एकटाच दिमाखात उभा होतं म्हणून ! आणि एवढ्या सगळ्या हिरवळीत ते लालचुटुक फुल कसं राजबिंड तोरा मिरवत होत ! आणि त्या पर्यटक झाडाच्या पानांची देखील कशी नाना - विविध रंग छतांची कशी स्पर्धा चालू होती जणू ! आणि त्या हिरवागार मोगऱ्याला बाई ! किती त्या चिमुकल्या कळ्या ग त्या .. !  लपून बसल्या होत्या त्या पानांच्या हिरवळीत ; म्हणून म त्याही नाही बघितल्या !
                     कधीही पाणी न घालता तलवारी काढून उभारलेला कोरफड एकमेव . कितीही तीव्र उन्हाळ्यात तितकाच गारवा देतो डोक्याला लावला की ! उंची भर वाढलेला हाच कडीपत्ता पोहे कसे झकास फक्कड करतो ! इमारती खालून  लांब वर पहिला तरी तो लाल चुटूक लॉरेन्स सगळ्यांच्या नजरेत भरतो . एक चिमणी मोगर्याची काळी केवढा तरी सुगंध अंड शांत पणा देते !
                     सगळकाही असण्यापेक्षा आणि काहीच नसण्यापेक्षा ; माझ्याकडे खूप काही होतं . बघायचं राहून गेलं; की काळोखामुळे नजरेतून निसटत होतं कोणास ठाऊक !

Sunday, October 4, 2009

"Antibiotic "


कधी वाटले तर इतके लिहावेसे वाटते कि काय लिहू आणि काय नको ! लिहिताना खूप काळजी देखील घ्यावी लागते. स्वतःची तत्वे जपून लिहिणे हे एक आव्हान आहे माझ्यासाठी.कारण माझी तत्वे.. !! तर.. आज चा विषय..

काहीतरी अधुरे असे वाटते . कुठेतरी परफेक्शन नाहीये. काहीतरी मिसिंग आहे .रात्री ..भर रात्री गाडीवरून मस्त भुर्भूरायला मज्जा येते... झकास.. !!काय मस्त वारे असते ! रस्त्यांवरची ती शांतता, ते वारे.. काही मुले गप्पा मारताना, काही लोक हॉटेल च्या बाहेर.. कोपर्यावरच्या जूसवाल्या हातगाडीवर गर्दी.. उत्तम.. !! पहाटेचे ते वारे आणि ते वातावरणच वेगळे असते. फिरून असे येताना मस्त पैकी रेंगाळत गरमागरम कॉफी घ्यावी …….  रात्री ११ च्या सुमारास.. सकाळी उठण्याचे टेन्सन नसावे..  :)
असे काही क्षण देखील आयुष्य जगण्यासाठी "Antibiotic " देऊन जातात.. हाहा !!

अश्या निवांत क्षणी विचार करायचे कि नाही, विचार कसे आणि कशाचे करायचे याचा विचार करता येतो..
" काहीतरी नाही असे खूप काही आहे बुवा .. !! "

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म........... "Antibiotic ".. कॉफी..वारे....पाऊस...

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.............. :D

Monday, September 14, 2009

नो कमेंट्स.....!!!!




....... आयुष्य म्हणजे फक्त अस चं , सुंदर, गुलाबी, रेशमी आणि मखमली नसतं. दरवेळी मोरपिसे अंगावरून फिर्व्व्ल्यासार्ख्खे अनुभव येत नित. कधी असा राग येतो या माणसांचा काय सांगू.. ! वैताग..वैताग नुसता. दरवेळी स्वार्थ, मात्लाबिप्ना. काय माझ काय दुसर्याच काय.. पाय खेचा , अडवणूक करा. ..........ईईईई.......! किळस कशी येत नाही त्यांची त्यांना. !!!!!
जग लाख सुंदर असेल हो; पण त्याच पावित्र्य हे लोक ठेवताच नाहीत . सगळीकडे नासधूस.. चिखल-फेक.. सगळ्या गोष्टीत राडा , किडे स्वतः निईत वागा; दुसर्याला हि वागू द्या.. ! सो सिम्पल ..! नाआआआआआआआअही.....

आम्ही किडे करणार, राजकारण ( हल्ली राजकारण या शब्दाचा अर्थ केवळ वाईट पद्धतीनेच घेतला जातो..! ) खेळणार. आमचा फायदा होवो न होवो आम्ही लोकच भले होऊ देणार नाही.. आणि जो चांगला वागेल त्याला त्याचा गळा आवळून त्याला मारणार. त्याला जगायचा हक्कच नाही ए चान्गुल्पनानी .. इथे काहीच सभ्य, सुसौस्कृत असताच नये.

माणूस माणूस राहिलाच नाही ए हेच खरे.. वैताग नाही चीड येते अशी भयंकर.. वाटते कोणीतरी सन्क्न मुस्काडात माराव्यात ..( माझा हात कोणाला लागणार नाही म्हणून दुसर्या कोणी तरी मारावे अश्यांना.. ) अशक्य..

याहून अधिक यावर काहीही बोलणे केवळ अशक्य अन्नी व्यर्थ देखील. कोण अंड कधी , कसा सुधरणार देव जाणे !!!!!

Sunday, September 6, 2009

"शांतता " ..

दूसरी पोस्ट या ब्लॉग वरची..लोक म्हणतील नवा ब्लॉग.. नीदान न्वाचे नौउं दीवस तरी अपडेट ठेवावा! पण नाही हो ; 'आयुष्यावर' लीहायच म्हणून लीहीता येत नाही.
कधी वाटते एक नीरव शांतता हवी.. गर्भ-रेशमी रात्रीसारखी.. शांत; पण हळुवार, मखमली ..!! कधी भर दुपारी देखील केवळ डोळे मीटून पु. लं. ची "Nilaee" अनुभवता यावी.. शांत.. खोल.. प्र्सन्न .. आल्हाददायक.. निलीशाआआआर ..! कधी मात्र ती असावी शांत, थंडगार, पवित्र.. अन्थाकारानाच्या आर-पार जाणारी.. घंटानादाने मंगलमय होणारी ..!! कधी स्नीगह्द.. बर्फाल्ललेली..
खोलीतल्या फुलदाणीतील फुले देखील कागदी भासवीत अशी.. जणू काही आयुष्याच्या कॅनवास वर फ़ीकट दगडी रंगाचा वश दिल्यासारखी.. !
शांतता.. निव्वळ शांतता म्हणावे आणी ही -न -ती कित्येक नाना-विविध रूपे दत्त म्हणून समोर उभी .. ! काही रूपे भीषण आणी अभद्र देखील.. !! एकांत हा शांततेचाच एक भाग. छोटे पिल्लू म्हणतात यावे असा! एकांतात असो-नसो ; पण आजकाल बहुदा सारे शांततेच्या शोधात असतात इतके मात्र नक्की.
शांतता " शोधा म्हणजे सापडेल " यानुसार आचरण करते असे माझे व्यक्तीशा म्हणणे आहे. काहींना शोधावी लागत च नाही .ती असतेच मुली त्यांच्याकडे. काहींना ती मिळवता येते. काहींना काळातच नाही आपण काय शोधात आहोत.. ! काहींना या शांततेचा गांध्मात्र ही नसतो .. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हनतात .. त्यामुळे बराच जणांना या शांततेच शोधच लागत नाही. काही लोक व्यर्थ घुटमळत राहतात; बाजारभावात शांतता शोधताना .. !! बिग बझार च्या सवलतीत बुधवारी एका वर एक फ्री मीळणारी ही गोष्ट नव्हे हे वीसरून .. ;)

................... असो .. मला नीदान कळले तरी .. शांतता शोधतय हो मी.. !

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...