आजचा दिवस समस्त महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून गणला जाईल. २०१२ हे साल खर्या अर्थाने अनेक लोकप्रिय , माननीय दिगाजांना आपल्यापासून हिरावून घेत आले आहे. मात्र वर्ष सरते वेळी , शिवसेने प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत आज मालवली. अर्थातच हा मथळा इंग्रजीतून लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ महाराष्ट्र नव्हे , तर भारताच्या इतिहासातील , राजकारणातील एक सोनेरी पान आज हरवले. अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांना राजकीय भाषणातून टीका म्हणजे काय हे आपल्या जहाल , विनोदी किनार असणार्या , सामन्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या आपल्या वाणीतून त्यांनी दाखवून दिले. मात्र परस्पर संबंध आणि राजकीय टीका या दोहोंचे भान ठेवणारे "साहेब" राजकारणातला मानाचा आध्याय ठरले.
