loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, June 16, 2025

मोठ्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण अनुभवानुसार शिकत जातो देव आपल्याला शिकवत जातो यामध्ये काही गोष्टी ज्या आपली मोठी माणसं आपल्याला सांगायची त्या गोष्टी खऱ्या आहेत हे मला समजलं त्या गोष्टी मी इथे लिहीत आहे ज्यांनी अनेकांना झाला तर फायदा होईल.


            Pic Curtsy kkhh movie media
आणि प्रत्येक घरामध्ये जनरेशन गॅप असते कारण माणसाच्या अब्रिंग पासून त्याच्या आयुष्यातील अनुभव हे त्या माणसाचे विचार ठरवतात जे दोन जनरेशनचे अर्थातच वेगळे असतात कारण आजच्या जगात तर अनेक नवीन गोष्टी फार पटापट येत आहेत आणि आपण बघितलं तर वर्षभरामध्ये मोबाईल फोनची फार अप्रतिम मॉडेल्स आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये खूप पटींनी प्रगती दिसते कशाच अनेक गोष्टी आणि बदल काळानुसार झालेले असतात ज्यानुसार नवीन पिढी तयार झालेली असते आणि यामध्ये बॅलन्स साधण्यासाठी आपण नेहमी सर्व बाजूंनी मिळणारा ज्ञान आणि सकारात्मकता घेण्यासाठी ओपन राहायला हवं मग ती आपल्यापेक्षा मोठे किंवा लहान कोणापासूनही मिळू शकते हे प्रत्येक वयाच्या प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि इतकं समजूतदार घरातील सर्वच व्यक्ती नसतात काही व्यक्ती वाईट देखील असतात काही व्यक्ती कमी जास्त इमोशनल असतात आणि मुळातच प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो त्यानुसार काही फ्रिक्शन घरामध्ये घडत असतात आणि हे नवीन नाही हे प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असतात

ज्या वयोगटामध्ये आपला हे लक्षात येतं त्यावेळी आपल्याला हे हँडल करून खूप कठीण जातात कारण हे नव्याने आपल्याला समजत असतं आणि आपल्या मनातील आई-बाबा किंवा तत्सम काका काकू ह्या इमेज ज्या लहानपणी आयडियल आहेत असं आपल्याला दाखवण्याचा हे सगळे प्रयत्न करतात जो चांगल्यासाठी पण असतो ज्यामुळे आपल्या मनात या सर्वांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो त्या इमेज बदलायला जातात आणि आपण माणूस म्हणून या सगळ्यांना बघू शकतो त्यामुळे अशावेळी सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हे तुमच्याच बाबतीत होत नाहीये हे सगळीकडे चालू आहे आणि हे योग्य वेळी समजलं नाही तर आपण खूप मोठ्या टेन्शनमध्ये असतो कारण त्यावेळी आपण प्रीपेर नसतो पुढच्या आयुष्यासाठी किंवा आपल्याला या घटना या गोष्टी नॉर्मल आहेत हे समजत नाही म्हणून आपल्या मनावर बराच आघात होण्याची शक्यता असते.

सर्वात पहिल्यांदा आनंदी कौटुंबिक आयुष्यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया
1. प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टी असतील तीच नाती ठेवावीत बाकी कुठेही भरकटू नये मग ती कुटुंबातील असतील किंवा कुटुंबा बाहेरील कम्युनिटी कॉन्टॅक्ट असले तरीसुद्धा
2. प्रेम म्हणजे परमेश्वर आहे आणि खरे प्रेम मिळणारा निश्चितच सुखी होतो
3. आपण अतिशय शुद्ध आचार विचार ठेवून देव भक्ती करत चांगल्या मार्गाने आयुष्य जगावे आणि जमेल तितकी आडलेल्यांना मदत करावी.
4. माणसाने आपले मन आणि बुद्धी नेहमी चांगल्या कामांमध्ये व्यस्त ठेवावी आणि कोणत्याही उद्दिष्ट शिवाय कधीही बसू नये. आपल्याला योग्य ते उद्दिष्ट आयुष्यात प्रत्येक वळणावर स्टेट केले पाहिजे आणि त्यानुसार आपल्या आचरण असले पाहिजे. 
5. आपल्याला आवडतील अशा गोष्टी नेहमी करत रहाव्यात. अर्थातच त्या गोष्टी दुसऱ्यांना त्रास देणे दुसऱ्यांना कमी लेखणे कोणाशी तुलना करणे आणि कुणालाही हानी पोहोचवणे अशा असू नयेत. कशामुळे आपण दुसऱ्यांकडून अखंड अपेक्षा करत नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा त्यांचा आयुष्य जगण्याची स्पेस आपल्याला देता येते. 
6. आपण स्वतः परमेश्वराची भक्ती करून ताकदवान व्हावे आणि आपल्या कुटुंबातील साऱ्यांच्या आयुष्यातील आपल्या भूमिका चोक निभावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करावा आणि बाकी परमेश्वरावर सोडावे. 
7. चांगले आणि वाईट दिवस हे ऋतूप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अधिक वाईट वाटून घेऊ नये आणि अति आनंदामध्ये हुरळूनही वेडे वागू नये. 
8. संकटकाळी एकटे राहून परमेश्वराची उपासना करावी संकट कधीही उपसरवू नयेत आणि आनंद सुद्धा साजरा करताना केवळ योग्य व्यक्तींबरोबरच साजरा करावा कारण सर्व व्यक्ती आपल्या आनंदामुळे आनंदी होत नाहीत हे या जगात एक कटू सत्य आहे. 
9. महाभारतामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येकच कुटुंबामध्ये काही प्रेमाची आणि काही फक्त हिशोब चुकविण्याची नाती असतात म्हणूनच ते आपल्या आयुष्यात कुटुंब म्हणून येऊ शकतात तरी प्रेमाची नाती ओळखून धर्माच्या मार्गावर चालावे आपले आणि परके कोण हे देव योग्य त्या वेळेला दाखवतो ज्याला आपण ज्योतिषामध्ये शनीची साडेसाती महादशा अशा व्याख्या मध्ये ओळखतो
10. वाईट घटना चटकन विसरून चांगली शुभ घटना करावी घरातील वातावरण कधीही खराब होऊ देऊ नये वाईट गोष्टींची चर्चा सुद्धा करू नये आणि कधीही आलेल्या अनुभवावरून संपूर्ण आयुष्य किंवा जगच वाईट असा आंबट तोंड करू नये कारण शेअर बाजार जसा वर खाली जातो तसाच आयुष्य सुद्धा ऊन पावसाचा खेळ आहे हा आयुष्याचा स्वभाव आहे आणि तो समजून घेतला तरच आपण हे आयुष्य जगू शकतो. 


आता मी अशा गोष्टी लिहीत आहे ज्या जुनी लोकं आपल्याला नेहमी सांगत आणि आपण देखील आपल्या पुढच्या जनरेशनला लहान असतानाच चांगलं फार गरजेचे आहे एकतर ते त्यांना समजते किंवा वाईट अनुभव आल्यामुळे त्यांना हे धडे मिळतात प्रत्येकाला एखादी गोष्ट कशी सांगायची ते देव ठरवतो. 
***** कोणतीही शुभ घटना मंगल कार्य घडण्याच्या आधी कोणालाही सांगू नये घडल्यानंतर आवश्यक त्या व्यक्तींना सांगावे. 
******* कृपा करून सोशल मीडिया च्या नादी लागणे त्याच्या आहारी जाणे त्याचा अतिरिक्त आणि गैरवापर आणि त्याचा आपल्या मनावर होणारा अतिशय गैर परिणाम ह्यांपासून प्रत्येकाने जपावे ही गोष्ट आनंदी कुटुंब व्यवस्थेसाठी अतिशय गरजेची आहे आजच्या काळामध्ये. 
******* सर्व गोष्टी आजकाल आपल्या भारतामध्येच सोशल मीडिया वरती काही लोक शेअर करत असतात ज्यांनी प्रचंड फटकेही त्यांना बसतात आणि मला अशा अनेक केसेस माहित आहेत तरी प्रत्येक गोष्ट ही लोकांना दाखवायची नसते आणि त्याचा शो बिजनेस करायचा नसतो ही गोष्ट ज्यांना आनंदी वैवाहिक आयुष्य आणि सुखी कौटुंबिक आयुष्य हवे आहे त्यांनी पाळावे. 

1. घरातील गोष्टी बाहेर जाऊ नये इतक्या हळू आवाजात बोलावे कारण भिंतीला कान असतात
2. कामवाली भांडीवाली घरात आल्यानंतर घरातल्यांनी तोंड बंद ठेवावे आणि घरातली जी स्त्री तिला हँडल करत असेल तिने तिच्याशी हळू आवाजामध्ये सर्व काम झाल्यानंतर तिच्या काही समस्या असतील तर त्याविषयी बोलावे आणि त्याच पद्धतीने पहिल्यापासून तिला सवय लावावी. 
3. नेहमी आपल्यासारख्या लोकांमध्ये राहावे आपल्या  बरोबरीच्या लोकांमध्ये राहावे. यामुळे आपल्या आजूबाजूचे घरातले वातावरण आपल्या परंपरा आपल्या समजूती आपले अनेक बाबतीतले विचार असल्याने आपण व्यवस्थित राहू शकतो आणि आपल्या समस्या आणि आपले फायदे आनंद जीवन जगण्याची पद्धती एक असल्यामुळे डोक्याला ताप नसतो मत भिन्नता आली किंवा वाईट विचार आले तर घरातील सगळ्यांची डोकी फिरायला वेळ लागत नाही
4. तिन्ही सांजाच्या वेळेला घरात असावे तुळशीपाशी दिवा लावावा आणि धार्मिक गोष्टी जसे की धूपदीप कुलदेवी कुलदेवी यांचे कुलाचार हे व्यवस्थित पार पाडावेत. 
5. फॅमिली आणि इतर कॉन्टॅक्ट यांच्यामध्ये बॅलन्स साधावा आणि कोणाशी काय बोलावे हे समजणे म्हणजे विवेक बुद्धी असते जी फॅमिली असो किंवा बाहेरचे कॉन्टॅक्ट सर्वांच्याच बाबतीत आपल्याला वापरली पाहिजे. 
6. प्रत्येकाची रोजची देवाची उपासना ही झालीच पाहिजे आणि ती तुम्ही काय करता हे सर्व लोकांना अजिबात सांगू नये. 
7. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आनंदाने साजरा कराव्यात घरामध्ये त्यामुळे अतिशय आनंदी वातावरण राहते आणि अधिकाधिक चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. 
8. काही माणसे अतिशय वाईट विचारांची दुसऱ्यांना चिकटणारी दुसऱ्यांना त्रास देणारी वाईट बोलणारी दुसऱ्याला कमी लेखणारी दुसऱ्याला नेहमी कॉपी करणारी दुसऱ्यांशी स्वतःची आणि सगळ्यांचीच एकमेकांशी तुलना करणारी अशा अनेक त्रासदायक पद्धतीची असू शकतात अशांपासून अजिबात न बोलता लांब राहावे. 
9. हे माझ्या आजोबांचं खास वाक्य जे तर मला नेहमी सांगायचे नेहमी माणसाने गोड बोलावं त्यामुळे त्याची निम्म्यापेक्षा जास्त काम होतात 😊🧿
10. दुर्लक्ष करणे हे जमलेच पाहिजे आणि अनेक गोष्टींकडे आयुष्यात आपल्याला दुर्लक्ष करावे लागते कारण प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्ट सुधरवण्याचा आपण एकट्याने ठेका घेतलेला नाही अखिल विश्वाचा लावणाऱ्या देवावर ते सोडून द्यावे रात्री झोपताना देवाला सर्व गोष्टींचा रिपोर्ट द्यावा आणि आपण देवावर सोपवून निर्धास्त झोपावे. 
12. तोंड बंद ठेवल्याने आयुष्यात चमत्कार होतात हे 100 वर एक टक्का सत्य आहे आणि माझ्या आयुष्यामधील काही कठीण टप्प्यावर हे केल्याने अक्षरशः मी खूप चांगल्या पद्धतीने हे सांगू शकते याने असे चमत्कार होतात ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. 
13. आपल्याशी कोणी बोलत असेल तर तर ते खूप छान ऐकून घ्यावे त्यामुळे सुद्धा समोरच्याला खूप छान वाटते बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या त्यांना यामुळे समजतात असं माझ्या बाबतीत सुद्धा होतं आणि काही विशिष्ट व्यक्तींची बोलणे हे आपल्याला आपल्यातूनच प्रश्नांची उत्तरं देत जातात आणि आपण कोणाबरोबर आहोत या गोष्टीमुळेच त्या माणसाला इतके बळ मिळते की त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या तो स्वतःबरोबर हँडल करतो त्यामुळे चांगल्या व्यक्तीला आपण सपोर्ट देऊ शकलो तर ही खूप छान गोष्ट असते
14. कोणतीही गोष्ट अति ताणू नये आणि अति समजूतदार कोणत्या बाबतीत असू नये. 
15. कोणत्याही अशुभ व्यक्ती गोष्ट घटनेचे नाव किंवा त्याविषयी चर्चा अजिबात करू नये. 
16. तिन्ही सांजेला देवापाशी दिवा लावून रामरक्षा सारखी स्तोत्र अवश्य म्हटली जावीत आणि घरात विष्णुसहस्त्रनाम रामरक्षा अशी स्तोत्र मुद्दाम मोठ्या आवाजात अवश्य लावावी. अजून एकदा तरी हे केले तरी संपूर्ण घराला त्यामुळे दैवी सुरक्षा प्राप्त होते. 
17. पितृ शांती श्राद्ध अशा गोष्टी आपल्या पितरांसाठी प्रत्येकाने अवश्य कराव्यात. 
18. आपले वर्षभराचे ठरलेले धार्मिक शेडूल प्रत्येकाने पाळावे ज्यामध्ये अनेक गोष्टी जसे की श्रावणामध्ये तिन्ही सांजेला कहाणी वाचणे ते कृष्ण जन्माच्या रात्री सगळ्यांनी मिळून काला करून कृष्णाची भक्ती करून त्याची मजा  चाखणे असो, अशा गोष्टी अवश्य कराव्यात ज्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीच राहते. कुटुंबातील विविध वयोगटाच्या विविध स्वभावाच्या व्यक्तींना प्रेम श्रद्धा आनंद या गोष्टी आपोआपच एकत्र आणतात आणि प्रेमामध्ये गुरफटून ठेवतात. 
19. जर कुटुंबासाठी कोणी आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांचे अवश्य ऐकावे आणि सरांनी साऱ्यांचे कल्याण करून घ्यावे. 


मुळातच घरातील वातावरण हे आनंदी असावे आणि प्रेम विश्वास मजा मस्तीत असावे योग्य त्या गोष्टी लहान मुलांना छान समजावून सांगाव्यात त्यांच्या भाषेमध्ये जेणेकरून त्यांना त्या पटतील आणि मोठ्यांच्या अनेक गोष्टी दुर्लक्ष करून त्याविषयी आपल्या जनरेशन नुसार चालू काळानुसार च्या गोष्टी आपण करत आपली प्रगती खुंटवू नये उदाहरणार्थ एका मुलीशी आज बोलले तेव्हा तिने सांगितल्याप्रमाणे एटीएम कार्ड वापरण्याविषयी देखील त्यांच्या ासू-सासर्‍यांना आजच्या जगातही सिक्युअर वाटत नाही आणि अशा अनेक गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात ज्या इतक्या बारीक असतात म्हणूनच त्याचा खूप त्रास होतो तर त्याच्या त्याला समजतात जेव्हा आपण देवाची उपासना करतो त्यामुळे ती चालू ठेवावी

मला वैयक्तिक रित्या असे वाटते की हळदीकुंकू साऱ्यांनी मिळून वडाला जाणे नवरात्राच्या वेळेस भोंडला करणे अशा काही बायकांच्या गोष्टी अगदी व्यवस्थित साऱ्यांनी चालू ठेवाव्यात म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही पती-पत्नींच नातं अधिक फुलायला मदत होते. 

जगामध्ये अनेक विचित्र गोष्टी भरलेल्या आहेत कारण हे संपूर्ण विश्व मायावी आहे आणि आपण या मायेमध्ये न ओळखता परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सुंदर सर्व चार आश्रम जगावेत आणि कधी गरज लागली तर रामायण महाभारत गीता अशा ग्रंथांचा जरूर अभ्यास करावा आपल्याला योग्य ते उत्तर नक्की मिळते. 

आवडते इतके या लेखासाठी पुरेसे आहे मी सुद्धा अनेक गोष्टी शिकले आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये लोकांना मदत करण्याविषयीच्या काही गोष्टी मी शिकले या गोष्टी मला नक्कीच उपयोगी पडतील कारण त्या माझ्या आधीच्या विचारांपेक्षा पूर्ण वेगळ्या गोष्टी मला अनुभवाने आणि देवाने शिकवल्या तरी या लेखामुळे अनेकांना रिलीफ मिळू दे त्यांचं टेन्शन जाऊ दे आणि आनंदी आयुष्य जगण्यात आली त्यांना एक मैत्रीपूर्वक छान गप्पा मारल्या सारख्या मस्त सूत्र सांगितल्यासारख्या या लेखाने फायदा होवो अशी परमेश्वरा चरणी प्रार्थना
❤ 




No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

मोठ्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण अनुभवानुसार शिकत जातो देव आपल्याला शिकवत जातो यामध्ये काही गोष्टी ज्या आपली मोठी माणसं आपल्याला सांगायची त्या ग...