loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, February 11, 2013

दुष्काळाचा ओव्हर व्ह्यू -2012-2013

आता फेब्रुवारी २०१३. पाऊस नाही म्हणून जी बोम्बाबोम्ब चलुए ती थेट या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत. सलग २ वर्ष दुष्काळात लोक भरडले जात आहेत. सरकार , मध्यस्त यांमध्ये जनावरे , पीके आणि मनुष्य भरडले जात आहेत.

दुष्काळाचा ओव्हर व्ह्यू  -

१. दुष्काळ आहे किवा नाही यावर वाद , शंका , मतभेद
२. किती टक्के , किती तालुक्यात यावर वाद , चर्चांना
३. पाणी पुरविणाऱ्या , जनावरांना चारा पुरविणाऱ्या व्यवस्थेवरून आणि व्यवस्थापनावरून वादंग चालू
४. लोकांना कित्त्येक ठिकाणी ८-१० दिवसातून एकदा पाणी मिळत. तुकाराम - या जितु जोशी च्या नव्या मराठी चित्रपटा सारखा दुष्काळ महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी आहे.
५. अनेक गावातून माणसे स्थलांतर करीत आहेत , गावे ओस पडीत आहेत
६. पिण्यास पाणी नाही , लांबवर विहिरी कोरड्या , जनावरांना चारा नाही , जनावरे खंगून मरत आहेत


या वर्षीच्या पावसाची , त्याहून महत्वाचे - वेळेवर येणाऱ्या पावसाची सारेच वाट बघत आहेत.

अपेक्षित तातडीचे उपाय :

१. पिण्याच्या पाण्याची सोय अगदी तातडीने करणे. अत्यंत चोखपणे.
२. जनावरांची काळजी घेण्यासाठी पशूवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात
३. शेतकऱ्यांचे हफ्ते वसूली काही काळ स्थगित करावे / पुढे ढकलावे / सवलतींचा विचार करावा
४. मुलांना शाळेसंबंधी  सवलतींचा विचार करावा
५. अर्ध्यावर पडलेले , रखडलेले सिंचन प्रकल्प त्वरेने पूर्ण करता यावेत याकडे लक्ष द्यावे

2 comments:

  1. Dated Feb.16th, 2013 .. Kolhapur, Sangli , Mahabaleshwar had heavy rains. Strawberry crops hampered. Nashik had a very severe rains a day before ; grapes hampered.

    ReplyDelete
  2. लिहिण्यास अत्यंत वाईट च वाटते आहे. दुष्काळ इंग्रजी चित्रपटानसारखे पार्ट १-२-३-४ काढतच आहे !
    मागील वर्षी जुलै एंड ला पाऊस आला. यावर्षी भारतात अनेक ठिकाणी अति पावसानं ओला दुष्काळ दाखवला . दक्षिण, उत्तर , पूर्व भारत , मध्य भारत सारीकडे अतिवृष्टी . स्वरूप - एकदाच रपारप येतो . १-२ दिवसात ढगफुटी सारखा आल्याने , सारीकडे ओला दुष्काळ , जीवित आणि वित्त हानी !

    महाराष्ट्र मात्र उन्हाने होरपळला ! थेट सप्टेंबर १०, २०१५ पर्यंत . भूजल साठा बाकी वर्षापेक्षा निम्म्यावर आला . बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने का होईना पण ३-४ दिवस पाऊस दिस्तोय. आज तारीख -१२ सप्टेंबर! पावसाळा शिफ्ट झाला आहे का?

    गरज आहे:

    १. पावसाच्या पाण्याच्या योग्य नियोजनाची !
    २. दुष्काळ - शक्यता गृहीत धरून , त्याचे पूर्व व्यवस्थापन - सक्तीने तद्न्य व्यावसायिक हवामान / पर्यावरण तज्ञांच्या सल्ल्याने करण्याची !
    ३. टेकड्या तोडून घरे बांधण्यावर योग्य पर्याय निवडण्याची . शहराचे नियोजन पुन्हा नव्याने नीट करणार्याची !
    ४. वनस्पती तज्ञांच्या सल्ल्याने उंच , भक्कम वाढतील , टिकाऊ असतील , जमिनीची धूप थांबवून वाहत्या ढगांना अडवून पाऊस देतील अशा झाडांच्या रोपणा विषयी सोसायटी , गणेश मंडळे , सरकारी कार्यालये , कोर्पोरेट कार्यालये इत्यादींना काम आणि सूचना / मदत देणे आवश्यक.
    ५. आखाती देशांकडून याविषयी काही शिकता येईल
    ६. शेतकर्यांना कोणती पिके लावावीत , अवेळी पाऊस / दुष्काळ यात पिके कशी तग धरून ठेवावीत इत्यादी मार्गदर्शन मिळावे. ABP माझा वरील " सातबाराच्या बातम्या " अत्यंत उत्तम ! अगदी प्रक्टिकल टिप्स देतात !

    ReplyDelete

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

मोठ्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण अनुभवानुसार शिकत जातो देव आपल्याला शिकवत जातो यामध्ये काही गोष्टी ज्या आपली मोठी माणसं आपल्याला सांगायची त्या ग...